राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे संत रोहिदास महाराज जयंतीदिनी कार्यक्रम ...
संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. राजापूर : संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. संत रोहिदास महाराजांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही तर आई - वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी शिकवणही दिली. संत रोहिदास हे त्याकाळातील आधुनिक संत होते, असे मत प्रमुख वक्ते दिलीप गोखले यांनी व्यक्त केले. राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे राजापूर नगरवाचनालयाच्या सभागृहात संत रोहिदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दिलीप गोखले बोलत होते. संत रोहिदास यांचे जीवन व कार्य यावर बोलताना त्यांनी आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, संतांनी दिलेल्या शिकवणीचे आपण सर्वांनी आचरण केले असते, तर समाजात ही जातीभेदाची दरी निर्माणच झाली नसती. या समाजान